Rahul Gandhi granted bail। काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आज सकाळी मोठा दिलासा मिळाला आहे. मानहानीच्या एका खटल्यात राहुल गांधी उत्तर प्रदेशातील सुलतानपूरच्या जिल्हा न्यायालयात हजर झाले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. राहुल गांधी सध्या उत्तर प्रदेशमध्ये ‘भारत जोडो न्याय यात्रा’साठी दाखल झाले आहेत.
दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम नरेश यांनी, ‘मंगळवारी सकाळी राहुल गांधी मानहानीच्या खटल्यात सुलतानपूर जिल्हा न्यायालयात हजर राहणार असल्याने भारत जोडो न्याय यात्रा काही काळ थांबेल, असे सांगितले होते.त्यानंतर पुन्हा दुपारी २ वाजल्यापासून राहुल गांधी यात्रेला सुरुवात करणार आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण? Rahul Gandhi granted bail।
2018 च्या एका प्रकरणात राहुल गांधी यांना समन्स बजावण्यात आले आहे. राहुल यांनी 2018 मध्ये बेंगळुरू येथे पत्रकार परिषदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय मिश्रा यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी राहुल गांधी यांना सुलतानपूरच्या खासदार/आमदार न्यायालयाने समन्स बजावले आहे.
विजय मिश्रा यांनी तक्रारीत म्हटले आहे की, ही घटना घडली तेव्हा मी भाजपचा जिल्हा उपाध्यक्ष होतो. राहुल गांधी यांनी अमित शहा यांना बेंगळुरूमध्ये खुनी म्हटले होते. राहुल गांधींच्या या आरोपांमुळे मी दुखावलो कारण मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. 4 ऑगस्ट 2018 रोजी सुलतानपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात राहुलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.’
किती शिक्षा होऊ शकते? Rahul Gandhi granted bail।
मानहानीच्या या प्रकरणात राहुल गांधींना जास्तीत जास्त 2 वर्षांची शिक्षा होऊ शकते. या प्रकरणी राहुल गांधी सकाळी 11 वाजता सुलतानपूर न्यायालयात हजर झाले. त्यासाठी मंगळवारी भारत जोडो न्याय यात्रा काही काळ थांबणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. संध्याकाळी राहुल गांधी अमेठीच्या बाबूगंजमध्ये जाहीर सभेला संबोधित करतील.