नवी दिल्ली – नुकत्याच आलेल्या पुराने केरळ राज्याचेही मोठे नुकसान झाले आहे पण तिकडे लक्ष देण्यात पंतप्रधान मोदींना वेळच मिळाला नाही. त्यांनी केरळला भेटही दिली नाही आणि केंद्रातर्फे कसली मदतही त्यांनी केली नाही असा आरोप कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे. मोदींनी अलिकडेच एका ट्विट मध्ये आपण केरळात गुरूवायूर मंदिराला भेट दिल्याचा उल्लेख केला आहे.
त्याचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी त्यांना उद्देशून एका ट्विटर संदेशात म्हटले आहे की तुमच्या केरळ भेटीनंतर भयानक पुरानेही केरळला भेट दिली आहे. त्यातून मोठे विनाशकारी नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर केरळला तुम्ही भेट दिली असती तर ती उपयुक्त ठरली असती. केरळला तुमच्या मदतीची अपेक्षा आहे. अन्य पुरग्रस्त राज्यांना तुम्ही मदत केली पण केरळला मात्र तुम्ही वगळले हे अयोग्य आहे असेही त्यांनी मोदींच्या निदर्शनाला आणून दिले.