नवी दिल्ली – संसदेत घुसखोरीचा मुद्दा अजून शांत झालेला नाही. विरोधकांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित करून अनेक प्रश्न विचारल्यानंतर अनेक खासदारांना निलंबित करण्यात आले. त्याचवेळी, खासदारांच्या निलंबनाविरोधात आज इंडिया आघाडीच्या ( india aghadi ) पक्षांनी जंतरमंतरवर निदर्शने केली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी हेही आंदोलनस्थळी उपस्थित होते. ( Congress Vs Bjp )
काँग्रेस खासदार राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी जंतरमंतर गाठून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी संसद भवनात दोन-तीन तरुणांनी प्रवेश केला होता. आम्ही सर्वांनी त्यांना उडी मारताना पाहिले. ते आत आले, धुमाकूळ घातला, भाजपचे सर्व खासदार पळून गेले..स्वत:ला देशभक्त म्हणवणाऱ्यांचा धुव्वा उडाला.
संसदेच्या सुरक्षेबाबत माझे दोन प्रश्न आहेत असे म्हणत राहुल गांधींनी काही सवाल उपस्थित केले. तेर म्हणाले,”तरुण संसदेत कसे पोहोचले याविषयी दोन प्रश्न आहेत. पहिला म्हणजे सुरक्षेतील त्रुटी कशाप्रकारे घडल्या ? कारण तरुणांनी धूर नळ्या आणल्या असतील तर ते काहीही आणू शकले असते.
तरुणांनी विरोध का केला हा दुसरा प्रश्न आहे. बेरोजगारीच्या निषेधार्थ त्यांनी हे पाऊल उचलले. देशातील इतर तरुणांचीही तीच अवस्था आहे. आज देशातील तरुण साडेसात तास इंटरनेट मीडियावर घालवत आहेत कारण नरेंद्र मोदी सरकार त्यांना रोजगार देत नाही.
#WATCH दिल्ली: कांग्रेस सांसद राहुल गांधी ने कहा, “कुछ दिन पहले संसद भवन में दो-तीन युवा कूदकर अंदर आ गए। उन्हें कूदते हुए हम सबने देखा। वे अंदर आए, उन्होंने थोड़ा धुआं फैलाया, भाजपा के सभी सांसद भाग गए… जो अपने आप को देश भक्त कहते हैं उनकी हवा निकल गई… वे अंदर कैसे आए? संसद… https://t.co/CPgYsTywrj pic.twitter.com/mbPQh9KbWt
— ANI_HindiNews (@AHindinews) December 22, 2023
खर्गेंची मोदीवर अप्रत्यक्ष टीका
“माझ्या जातीमुळे माझा अपमान होत आहे, असे राज्यघटनेतील उच्च पदावर असलेले लोक म्हणतात.. असं सांगत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अप्रत्यक्षपणे मोदींवर टीका केली.खर्गे म्हणाले,तुमची ही अवस्था असेल तर माझ्यासारख्या दलिताची काय अवस्था असेल?
जेव्हा मी सभागृहात बोलायला उठतो, मला बोलण्याची संधीच दिली गेली नाही… मग हे भाजपचे लोक, भाजप सरकार दलिताला बोलू देत नाही, असं मी म्हणायचं का ? असा जळजळीत सवाल खर्गेंनी यावेळी उपस्थित केला.