मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. भाजपकडून तर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. त्यातच भाजप आमदार योगेश सागर यांनी राहुल गांधीवर ‘पप्पू’ म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
योगेश सागर यांनी,”राहुल गांधी यांना देशाचा इतिहास माहिती नाहीये. त्यांचा स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास कमी आहे. राहुल गांधी 100% पप्पू माणूस आहे. राहुल गांधी क्रांतीसूर्य सावरकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांना देश माफ करणार नाही, असे योगेश सागर यांनी म्हटले आहे.
भारत जोडो यात्रेदरम्यान संबोधित करताना राहुल गांधी यांनी विनायक सावरकर यांच्यावर टीका केली. सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. असं म्हणत राहुल गांधी यांनी सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेवर टीका केली आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल गांधींच्या या विधानाचा निषेध केलाय. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारा विचार जमीनीमध्ये गाडल्याशिवाय शांत बसणार नाही, असं फडणवीस म्हणालेत.स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारा विचार जमीनीमध्ये गाडल्याशिवाय शांत बसणार नाही, असं फडणवीस म्हणालेत. याचसोबत भाजपच्या अन्य नेत्यांनीही सावरकरांच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.