Rahul Gandhi । एसबीआय सादर केलेल्या निवडणूक रोख्यांवरून आता विरोधी पक्षाने सत्ताधारी भाजपवर टीका करण्यास सुरुवात केलीय. त्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील मोदी सरकारवर टीका केली. निवडणूक रोखे म्हणजे वसुलीचा एक मार्ग असल्याचे म्हणत सरकारवर हल्लाबोल केला आहे. सध्या त्यांची भारत जोडो न्याय यात्रेत महाराष्ट्रात दाखल झाली यावेळी त्यांनी ही टीका केली.
राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर यावेळी जोरदार टीका केली. त्यांनी निवडणूक रोखे योजना म्हणजे जगातले सर्वात मोठे खंडणी वसूल करणारे रॅंकेट आहे, असे म्हणाले. तसेच या योजनेचा वापर विविध राज्यांतील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी करण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, या मुद्द्यावरून आता देशातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
“निवडणूक रोखे योजना म्हणजे खंडणी वसूलीचे रॅकेट Rahul Gandhi ।
“निवडणूक रोखे योजना म्हणजे जगातले सर्वात मोठे खंडणी वसूल करणारे रॅकेट आहे. या योजनाचा वापर राजकीय पक्ष फोडण्यासाठी आणि विविध राज्यांमध्ये असलेले काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी करण्यात आला आहे. तसेच ईडी, निवडणूक आयोग, सीबीआय ही भाजपाची शस्त्रे आहेत. जर या संस्थांनी त्यांचे काम व्यवस्थित केले असते, तर त्यांच्यावर अशाप्रकारचे आरोप झाले नसते”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
सत्तेत आल्यावर तपस यंत्रणांचा योग्य वापर Rahul Gandhi ।
पुढे बोलताना त्यांनी सत्तेत आल्यास काँग्रेस पक्ष अशाप्रकारे तपास यंत्रणांचा वापर करणार नाही, असे आश्वासनही दिले. “भाजपाने हे लक्षात ठेवावं, की आज नाही तर उद्या केंद्रातील भाजपाचे सरकार बदलेल. त्यानंतर त्यांच्यावरही अशाप्रकारची कारवाई होऊ शकते. मात्र, आम्ही तपास यंत्रणांचा असा गैरवापर करणार नाही, याची मी हमी देतो”, असे ते म्हणाले.