पालघर – तीन टक्के असणाऱ्या लोकांच्या हातात न्यायव्यवस्था, मीडिया, पैसा, कॉर्पोरेट या सर्व गोष्टी आहे, असे म्हणत ८८% लोकांना प्रभूचे गुणगाण करावे आणि उपाशी मरत रहावे, असे सरकारकडून सांगितले जात आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी पालघरमधील सभेत केला आहे.
राहुल म्हणाले की, केवळ ९० (आयएएस) प्रशासकीय अधिकारी देश चालवत आहे. त्यात ८८ टक्के समाजातील लोक किती आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर पिक विमाच्या मुद्यावरूनही राहुल गांधींनी मोदी सरकार जोरदार हल्लाबोल केला.
पिकविम्यासाठी 35 हजार करोड रुपये विमा कंपनीने देण्यात येतात या 16 कंपन्यांमध्ये तुमच्यातील एकाही व्यक्तीचे नाव मला दिसले नाही. जेव्हा दुष्काळ किंवा अवकाळी मुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते, तेव्हा नुकसान झाल्यानंतर कंपन्यांकडून पिक विम्याचे पैसे मिळत नाहीत, जीएसटीतून आलेला तुमचा पैसा 16 कंपन्यांच्या हातात जातो तिथे तुमचा एकही माणूस नाही, असे म्हणत काही लोकांच्या हाती सर्व सूत्र असल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे.
नेहमी गरीब लोकांची जमीन अधिग्रहण केली जाते कधी तुम्ही अदानींची जमीन अधिग्रहण केली असे ऐकले का पण तुम्ही आदिवासी समाजाच्या व्यक्तीकडे जा, त्याची जमीन अधिग्रहण केलेली असते असे म्हणत राहुल गांधींनी आदिवासींवर अन्याय होतो, असेही म्हटले.
मोदी ओबीसी नाहीत –
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी नसून तर जनरल प्रवर्गातील आहेत. गुजरात सरकारने कायदा बदलून त्यांच्या जातीला ओबीसी मध्ये समाविष्ट केले नरेंद्र मोदींनी दहा वर्षात 88% समाजासाठी काय केले हा खरा प्रश्न आहे. 88 टक्के लोक यांच्या हातात मीडिया हाऊस आहेत ना मोठे हॉस्पिटल आहेत केवळ त्यांच्याकडून सर्व काही काढून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.