नवी दिल्ली – करोनाविरुद्धचा लढा आपण निश्चितच जिंकू शकतो, फक्त त्यासाठी आपण वैद्यकीय तज्ज्ञ व सरकारने सांगितलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत पालन केले पाहिजे.अशा शब्दात भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याने देशवासियांना आवाहन केले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 64 झाली आहे, तर देशात 200 हून अधिक रुग्ण आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सरकारकडून राबवण्यात येत आहेत. तसेच राज्यसरकारबरोबरच सेलिब्रिटी, खेळाडू हे देखील सोशल मीडियाव्दारे कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करीत आहेत.