ओव्हल – अजिंक्य रहाणे व शार्दूल ठाकूर यांची जबाबदार अर्धशतकी खेळी व रवींद्र जडेजाची उपयुक्त फलंदाजी यांच्या जोरावर भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाला समाधानकारक प्रत्युत्तर देताना आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 296 धावा केल्या. मात्र, तरीही ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 179 धावांची मोठी आघाडी गेतली असून त्यांचेच या सामन्यावर वर्चस्व कायम राहिले आहे.
तिसऱ्या दिवशी 5 बाद 151 धावांवरून पुढे खेळ सुरू झाल्यावर श्रीकर भरत लगेचच परतला. त्यानंतर अजिंक्य रहाणे व रवींद्र जडेजा यांनी दमदार शतकी भागीदारी केली व संघाला अडीचशे धावांची मजल मारुन देत डावही सावरला. जडेजा भरात आलेला असतानाच 48 धावांवर बाद झाला. त्याने 51 चेंडूत 7 चौकार व 1 षटकार फटकावले. त्यानंतर रहाणेने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने संयमी फलंदाजी करत शतकाकडे कूच केली. मात्र, शतकाला अवघ्या 11 धावांची गरज असताना रहाणे बाद झाला. या खेळीत त्याने 129 चेंडूंचा सामना करताना 11 चौकार व 1 षटकार फटकावला. त्यानंतर उमेश यादवनेही निराशा केली. मात्र, त्यावेळी ठाकूरने एक बाजू भक्कमपणे सांभाळताना अर्धशतक पूर्ण केले.
मात्र, महंमद शमीने केलेल्या 13 धावांचा अपवाद वगळता त्याला अन्य कोणत्याही फलंदाजाची साथ लाभली नाही. तो देखील धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात 109 चेंडूंचा सामना 6 चौकारासह 51 धावांची खेळी केली. त्यातही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी तब्बल 29 धावा अवांतर स्वरूपात देत भारताच्या धावसंख्येला हातभारच लावला. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक 3 गडी बाद केले. कॅमेरुन ग्रीन, स्कॉट बोलॅंड व मिचेल स्टार्क यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. नाथन लॉयनने 1 बळी मिळवला.
ठाकूरचे अष्टपैलूत्व
शार्दूल ठाकूरने भारतीय संघात का स्थान दिले गेले ते आपल्या अष्टपैलू कामगिरीने सिद्ध केले. संघाला गरज असताना त्याने अचूक गोलंदाजी करत डेव्हीड वॉर्नर व शतकवीर स्टीव्ह स्मिथ हे दोन बळी घेतले. तसेच संघाची अवस्था ओलखून जबाबदारीने फलंदाजी करत अर्धशतकी खेळीही केली. या खेळीमुळे त्याने टीकाकारांना योग्य उत्तर आपल्या खेळीतूनच दिले आहे. व आपली निवड सार्थ ठरवली.
चेंडूशी छेडखानीचा संशय
भारताची फलंदाजी सुरू असताना ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी चेंडू आऊटऑफ शेप असल्याची तक्रार पंचांकडे केली त्यांनीही पाहणी केल्यावर चेंडू बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या गोलंदाजांनी निश्चितच चेंडूशी छेडखानी केली. काराण त्याच चेंडूवर रिर्व्हस स्विंग काय मिळत होता. याच चेंडूवर विराट कोहली व चेतेश्वर पुजारा बाद झाले.
ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज कॅमेरुन ग्रीन पुजाराला चक्क चेंडूची चमक दाखवताना दिसला. हाच चेंडू रिर्व्हस ठरला. पोठापाठ कोहलाही असाच चेंडू टाकला गेला. समालोचकांबरोबरच बीसीसीआयला हे लक्षात कसे आले नाही, असे सवाल पाकिस्तानचा माजी कसोटी क्रिकेटपटू बसीत आली याने केला आहे. विशेष म्हणजे त्याच्या या प्रश्नावर अद्याप कोणीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.