सेंच्युरिअन : भारताच्या कसोटी संघाचे अविभाज्य भाग असलेले अजिंक्य रहाणे, महम्मद शमी आणि फिरकिपटू आर अश्विन यांना आज पासून सुरु झालेल्या भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेत दमकार कामगिरी करत कसोटी कारकिर्दीत काही खास विक्रम करण्याची संधी असणार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करणार्या पदार्पणवीर श्रेयस अय्यर, मयंक आगरवाल आणि केएल राहुल यांच्या कमागिरीवर सर्वांचे लक्ष असले तरी रहाणे, शमी आणि अश्विन यांना खुनावत असलेले विक्रम त्यांच्या कसोटी कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरणार आहेत.
1. अजिंक्य रहाणे
भारताच्या माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे जसा त्याच्या कलात्मक फलंदाजीसाठी ओळखला जातो तितकाच तो स्लीमधील क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. जगात सध्या खेळत असलेल्या खेळाडूंपैकी स्लीपमध्ये सर्वोेत्तम क्षेत्ररक्षक असलेल्या मुंबईकर अजिंक्य रहाणेला त्याच्या कसोटी कारकिर्दीत 100 झेल पूर्ण करण्याची संधी या तीन सामन्यांच्या मालिकेत असणार आहे. जर या मालिकेत रहाणेने 3 झेल पकडले तर तो भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये 100 झेल घेणारा 6 खेळाडू ठरेल.
2. रविचंद्रन अश्विन
गेल्या एक दशकापासून कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात प्रभावशाली गोलंदाज असलेल्या आर अश्विनने नुकतेच हरभजन सिंगचा 417 कसोटी बळींचा विक्रम मोडीत काढला. यानंतर आत अश्विन कपिल देव (434 बळी) यांना मागे टाकण्याच्या तयारीत आहे. जर अश्विनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत 8 बळी घेतले तर तो कपिल देव यांना मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये सर्धाधिक बळी घेणार्या गोलंदाजांमध्ये अनिल कुंबळे (619 बळी) यांना मागे टाकत दुसर्या स्थानी विराजमान होईल.
याचबरोबर अश्विनने कसोटी क्रिकेट कारकिर्दीत आतापर्यंत 7 वेळा एका सामन्यात 10 बळी पटकावले आहेत. तर दिग्गज अनिल कुंबळे यांनी अशी कामगिरी 8 वेळा केली आहे. त्यामुळे या मालिकेतील 3 सामन्यांत अश्विनकडे कुंबळे यांना मागे टाकण्याची संधी असणार आहे.
3. महम्मद शमी
महम्मद शमी सध्या भारतीय संघात सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज म्हणून महम्मद शमीकडे पाहिले जाते. आपल्या वेगवान आणि स्विंग गोलंदाजीने अनेकांची भंबेरी उडवणार्या महम्मद शमीने आतापर्यंत खेळलेल्या 54 कसोटी सामन्यां 27.57 च्या सरासरीने 195 फलंदाजांची शिकार केली आहे. त्याला 200 बळींचा टप्पा गाठण्यासाठी अवघ्या 5 बळींची गरज आहे. शमीने जर या तीन सामन्यांच्या मालिकेत 5 बळी मिळवले तर कसोटी क्रिकेटमध्ये 200 बळी मिळवणार तो 11वा गोलंदाज ठरेल.