देवरिया (यूपी) – समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजपच्या 400 पार च्या घोषणेची पुन्हा एकदा खिल्ली उडवली असून हा सपशेल पडेल दावा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपला १४० जागा मिळवणे सुद्धा आता जिकीरीचे बनले आहे असे त्यांनी म्हटले आहे.
त्यांनी असा दावा केला की ज्या कंपन्यांनी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपला मोठ्या प्रमाणात देणगी दिली त्या कंपन्या वस्तूंच्या किमती वाढवून हे पैसे वसूल करत आहेत, ज्यामुळे देशभरात महागाई वाढली आहे.
काँग्रेसचे देवरिया लोकसभेचे उमेदवार अखिलेश प्रताप सिंह आणि कुशीनगरमधील सपा उमेदवार अजय कुमार सिंह यांच्या समर्थनार्थ येथे आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त रॅलीला संबोधित करताना यादव यांनी दावा केला की उत्तर प्रदेशात बदलाचे वारे वाहत आहेत.
इंडिया आघाडीला मिळणारा पाठिंबा पाहून मला असा विश्वास आहे की ४ जून रोजी भाजपचा उत्तरप्रदेशातून सफाया होईल.
भाजपच्या ४००-पारच्या घोषणेवर हल्ला करताना ते म्हणाले, त्यांनाच चारशेहून अधिक जागा गमवाव्या लागत आहेत. १४० कोटी लोक त्यांना १४० जागा मिळवण्यासाठीही तळमळवतील.
अखिलेश यादव यांनी लोकांना मत देताना प्रलोभनांपासून सावध राहण्यास सांगितले . भाजपचा प्रत्येक शब्द आणि प्रत्येक आश्वासन खोटे ठरले. केंद्र सरकारच्या दहा वर्षाच्या काळात आणि राज्य सरकारच्या सात वर्षांच्या काळात ज्या सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्या होत्या, त्या मिळणे दूरच, शेतकरी आणि तरुणांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
गरिबांना त्यांच्यासाठी काम करणारे सरकार हवे आहे, आणि लोकांनी तोच निर्धार केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे उत्तर प्रदेश प्रभारी अविनाश पांडे यांनीही या मेळाव्याला संबोधित केले. देवरिया आणि कुशीनगरमध्ये सातव्या टप्प्यात १ जून रोजी मतदान होणार आहे.