Qatar-India Relations। आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा भारताची यशस्वी कूटनीती पाहायला मिळाली. कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावलेल्या ८ माजी नौसैनिकांची अखेर सुटका करण्यात आली. त्यातील ७ जण मायदेशीदेखील परतले आहेत. परराष्ट्र मंत्रायलयाने याविषयी माहिती दिली आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या नौसैनिकांच्या सुटकेसंबधी एक निवेदन जारी केले आहे. कतारविरुद्ध हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली सर्व आठ माजी नौसैनिकांना मध्यपूर्वेतील या छोट्या देशाच्या तुरुंगात कैद करण्यात आले होते. कतार न्यायालयानेही फाशीची शिक्षा सुनावली होती, भारताच्या विनंतीवरून, कतारच्या अमीराने त्याची शिक्षा आधीच कमी करत जन्मठेपेत रूपांतरित केले.
कतारच्या निर्णयाचे भारताकडून स्वागत Qatar-India Relations।
कतारी न्यायालयामार्फत आठ भारतीय नागरिकांची सुटका करण्याच्या निर्णयाचे भारताने स्वागत केले आहे. आखाती देशाच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा जाहीर केली तेव्हा भारताने आपल्या मुत्सद्देगिरीचे प्रदर्शन करत त्याविरुद्ध अपील केले. त्याचा फायदाही दिसून आला. कारण 28 डिसेंबर 2023 रोजी भारताचे अपील लक्षात घेऊन आठ नागरिकांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली होती.
हेही वाचा
भारतीय मुत्सद्देगिरीचे यश ! कतारमधील न्यायालयाकडून 8 भारतीयांना फाशीच्या शिक्षेतून दिलासा
परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटले? Qatar-India Relations।
परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘कतारमध्ये अटकेत असलेल्या अल-दहरा ग्लोबल कंपनीसाठी काम करणाऱ्या आठ भारतीय नागरिकांच्या सुटकेचे भारत सरकार स्वागत करते. त्यापैकी आठ पैकी सात भारतीय सुखरूप भारतात परतले आहेत. मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, ‘या नागरिकांची सुटका आणि त्यांच्या घरी परत जाण्याच्या कतारच्या अमीराच्या निर्णयाचे आम्ही कौतुक करतो.’
कुटुंबीयांनी सुटकेची विनंती केली होती Qatar-India Relations।
आठ भारतीयांच्या सुटकेसाठी कतार आणि भारत यांच्यात राजनैतिक चर्चा सुरू होती. याचा परिणाम असा झाला की नौसैनिकांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली गेली. सैनिकांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या सुटकेसाठी परराष्ट्र मंत्रालयाकडे दाद मागितल्यानंतर तुरुंगातील त्यांच्या मुक्कामाचा कालावधी आणखी कमी करण्यात आला. कुटुंबातील सदस्यांची दुर्दशा समजून मंत्रालयाने सर्व कायदेशीर उपाय आणि राजनयिक मार्गांनी त्यांची सुटका केली आहे.