पुणे- पीएमपीची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते मनपा ही बससेवा पूर्ववत करण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत. ही बससेवा करोनाच्या पार्श्वभूमीवर खंडीत करण्यात आली होती. मात्र, ती अजूनही बंदच आहे. त्यामुळे विद्यापीठामधील विद्यार्थी, कर्मचारी आणि सामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे.
नागरिकांना बसेससाठी दोन ते तीन किलोमीटर पायी जावे लागत आहे. त्यामुळे ही बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. याबाबत भाजपचे पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांना निवेदन दिले आहे. यावेळी पीएमपीचे संचालक प्रकाश ढोरे देखील उपस्थित होते.