pune news – व्हॉटसऍपवर स्टेटस ठेवल्याचे कारण आणि पूर्ववैमनस्यातून तळेगाव दाभाडे येथे बीएससीच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या 22 वर्षीय तरूणाचा खून (murder) केल्याप्रकणात ऋतिक कांताराम चव्हाण (वय 21,रा. वडगाव मावळ) याला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांनी जामीन मंजूर केला.
यश रोहिदास आसवले (रा. टाकवे बु. ता.मावळ) असे खून झालेल्याचे नाव आहे. त्याने ऍड. हर्षवर्धन मिलिंद पवार यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. चव्हाण हा घटनास्थळी उपस्थित नव्हता.
गुन्ह्यातील फिर्याद अनोळखी व्यक्तीविरोधात आहे. त्यामुळे पोलिसांनी आरोपीला फक्त संशयावरून अटक केली आहे. गुन्ह्याचा तपास पूर्ण असून, दोषारोप पत्रही दाखल झाले आहे.
सहा आरोपींना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे असवलेला जामीन देण्याची मागणी ऍड. हर्षवर्धन पवार यांनी केली. 22 मे 2020 रोजी यश व त्याचे मित्र जेवण झाल्यावर रात्री 11 वाजता टाकवे गावातून फिरायला निघाले होते.
त्यावेळी रस्त्यावरून जात असताना मोटारसायकल आलेल्या अनोळखींनी यशच्या डोक्यावर, शरीरावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी दुसऱ्या दिवशी असवले याला अटक केली होती