मुंबई – डिसेंबर 2022 मध्ये वाहतुकीसाठी खुला झालेल्या समृद्धी महामार्गावर आतापर्यंत एकूण 1282 दुर्घटना घटना घडल्या ज्यामध्ये 67 वाहन अपघाताच्या घटना आहेत. यामध्ये एकूण 135 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) दिली आहे.
समृद्धी महामार्गावरील अपघात –
– शनिवारी (14 ऑक्टोबर) मध्यरात्री समृद्धी महामार्गावर बुलढाण्याहून नाशिकला जाणाऱ्या खासगी टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली आणि या अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 23 जण जखमी झाले. या टेम्पो ट्रॅव्हरलमध्ये एकूण 35 प्रवासी होते.
– 30 जून रात्री 2 वाजताच्या सुमारास सिंदखेडराजानजीक ट्रॅव्हल्स पटली होऊन गाडीने जागीच पेट घेतला. या अपघातात बसमध्ये झोपलेल्या 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. अपघातग्रस्त बस ही नागपूरहून पुण्याला जाणारी होती. बुलढाण्यातील सिंदखेडराजानजीक पिंपळखुटा गावालगत समृद्धी महामार्गावर हा अपघात घडला.
– 31 जुलैला मध्यरात्री महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना ग्रेडर-मशिन कोसळली. या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला. 31 जुलै मध्यरात्री शहापूर तालुक्यातील सरलांबेजवळ घडली.
दरम्यान, यासह समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होऊन मार्ग वाहतुकीसाठी सुरु झाल्यानंतर महामार्गावार मोठ्या अपघातांसह किरकोळ असे एकूण 1282 दर्घटनांची नोंद झाली आहे. नियंत्रण गमावणे, घसरणे, टायर फुटणे, यांत्रिक अपयश, आग, वेगाने गाडी चालवणे आणि मागून टक्कर, अशी अपघाताची कारणे समोर आली आहेत.
समृद्धी महामार्गाचे उद्दीष्ट हे मुंबई ते नागपूर 8 तासांत अंतर पार करण्याचे आहे. या महामार्गाची लांबी 701 किमी आहे. हा महामार्ग 10 जिल्ह्यांमधील 390 गावांना जोडणारा महामार्ग आहे.