सासवड -पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना 24 तास विद्युतपुरवठा मिळावा त्याचबरोबर प्रतिहॉर्स पॉवरप्रमाणे महावितरण ने निश्चित केलेल्या बिलापैकी दोन तृतीयांश रक्कम अनुदान रुपाने दिले जाते. यापैकी एक तृतीयांश शेतकऱ्यांनी भरावायचे असते; परंतु महावितरण विभागाकडून शेतकऱ्यांची पिळवणूक करून संपूर्ण रक्कम वसूल केली जाते, असे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गिरमे यांनी यावेळी सांगितले.
सासवड (ता. पुरंदर) येथील जयप्रकाश चौकामध्ये शेतकरी संघटनेच्या वतीने “विचार मंथन’ सभेचे आयोजन करण्यात आले होते. या विचार मंथन सभेचे निवेदन मुख्यमंत्र्यांना महावितरणच्या माध्यमातून पाठविण्यात आले त्यावेळी दिलीप गिरमे बोलत होते. यावेळी पुरंदर तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पोमण, सासवड शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सासवड शहर माजी अध्यक्ष महेश जगताप, सासवड शहर भाजप उपाध्यक्ष अमोल जगताप, साहेबराव काळाणे अरुण जगताप, अशोक बोरवके,
नाना वनवे, उत्तम जगताप, नाना जगताप-कोपरगावकर उपस्थित होते. दिलीप गिरमे म्हणाले की, औद्योगिक क्षेत्रासाठी 24 तास विद्युतपुरवठा केला जातो; परंतु शेती उद्योगाला रात्रीचा वीजपुरवठा केला जातो तो देखील 8 तास पुरेशा दाबाने नसतो. तर शेती उद्योगाला लोड शेडिंग, वीज ट्रीप होणे, ओव्हरलोड जास्त असणे अशा समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. तर औद्योगिक क्षेत्राला महावितरणकडून कोणताही त्रास दिला जात नाही, असे त्यांनी नमूद केले.
महावितरणने शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत व शेतकऱ्यांचा कोणत्याही प्रकारचा विद्युतपुरवठा खंडित करू नये. यासाठी लवकरच शासन दरबारी पाठपुरावा केला जाईल.
– प्रदीप पोमण, अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, पुरंदर तालुका