जुन्नरच्या आदिवासी भागातील स्थिती : काढणीच्या कामाला वेग
ओतूर – जुन्नर तालुक्याच्या माळशेज आदिवासी भागात भात कापणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. यावर्षी पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्याने भात उत्पादनामध्ये घट होणार असल्याने परिसरातील भात उत्पादक शेतकरी आर्थिक विंवचनेत आहेत.
माळशेज परिसरामध्ये पारगाव, बगडवाडी, तळेरान, खुबी, करंजाळे या ठिकाणी भात कापणीची सुरुवात झाली आहे. परिसरातील शेतकरी कुटुंब सध्या भात कापणी व मळणी कामात व्यस्त आहे.
काही ठिकाणी मळणीसाठी यंत्राचा तर काही शेतकरी पारंपरिक पद्धतीने जोडणी करून मळणी केली जात आहे. ग्रामीण भागात अजूनही पेरा पद्धतीने भात पिके घेतली जात आहे. आदिवासी भागात इंद्रायणी, दप्तरी, कोळंबा, राजबोक मोठ्या प्रमाणात काढणी सुरू झाली आहे.
यंदा पाऊस लांबणीवर पडल्याने खरीप पिकांची लागवड ही लांबणीवर पडली आहे. त्यातच मध्यंतरीच्या काळात पावसाने दडी मारली त्यानंतर पावसाने हजेरी लावली मात्र पिकाच्या तुलनेत तो तुरळकच होता. आता आलेल्या पिकातून तांदूळ बाहेर येऊन जमिनीत पडतो त्यामुळे पिकात घट होण्याची शक्यता आहे.
– सिताराम कारभळ, भात उत्पादक शेतकरी