बारामतीतील बळीराजा चिंतातूर
मोरगाव – बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात सातत्याने असलेल्या ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर करपा रोग पडला आहे. यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे.
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील मोरगाव, तरडोली, आंबी बुद्रुक, आंबी खुर्द, मुर्टी, लोणी भापकर, माळवाडी या परिसरातील शेतकर्यांनी उपलब्ध असलेल्या पाण्यावर कांदा या नगदी पिकाचे उत्पादन घेतले आहे. मात्र गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने ढगाळ वातावरण आहे.
तसेच या आठ दिवसांमध्ये वातावरणातील झालेल्या बदल्यामुळे विहरींचे पाणी मोठ्या प्रमाणात कमी झाले असून विहरी मोकळ्या झाल्या आहेत. यामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे. उपलब्ध पाण्यावरील पाण्यावर बाकीचे पिकं न घेता हमखास उत्पादन मिळेल या आशेवर या भागातील शेतकर्यांनी कांदा पिकाचे उत्पादन घेतले.
मात्र तोंडात घास घालण्याची वेळ आली असतानाच आलेला कांद्यावर पडलेल्या रोगामुळे या भागातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे या भागातील शेतकरी चिंतातूर झाला आहे.