शिक्रापूर – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केलेली असताना त्यांनी मुंबईच्या दिशेने प्रवास सुरु केलेला असताना ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे फलक लागून गावागावात मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत होत आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन आज मनोज जरांगे पाटील हे रांजणगाव ते वाघोली असा प्रवास करत असताना त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी रस्त्याने पाणी, नाष्टा, जेवण व चहाचे स्टॉल उभारुन येणार्या आंदोलकांना मोफत चहा, पाणी, नाष्टा व जेवण देत येणार्या मराठा आंदोलकांचे स्वागत केले.
यावेळी आपल्या संघर्ष योद्ध्याला पाहण्यासाठी अनेक गावातील नागरिकांनी पुणे-नगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी करत मनोज जरांगे यांचे आगमन होताच फटक्याची आतषबाजी करत फुलांची उधळण करत जरांगे यांचे स्वागत केले. तर काही ठिकाणी चक्क जेसीबी व क्रेनमधून फुलांची उधळण करुन त्यांचे स्वागत करण्यात आले;
मात्र सकाळपासून मनोज जरांगे यांची वाट पाहत नागरिक, ग्रामस्थ व महिला त्यांच्या स्वागतासाठी भर उन्हात रस्त्याचे कडेला उभे असल्याचे दिसून आले, तर दुपारी बारा वाजता शिक्रापूरमध्ये पोहोचणारे मनोज जरांगे त्यांच्या गर्दीतून वाट मिकलो करत सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शिक्रापूर येथून पुढे मार्गस्थ झाले;
मात्र तरी देखील त्यांना पाहण्यासाठी तसेच त्यांच्या स्वागतासाठी नागरिकांची मोठी गर्दी असल्याचे दिसून आले, दरम्यान यावेळी माध्यमांशी बोलताना कोणतेही पद माझ्याकडे माही मात्र आज हा समाज व हि गर्दी मी कमावली असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.