गामविकास मंत्र्यांचा निर्णय : 1 जानेवारीला ठरवले होते अपात्र
वालचंदनगर : एक महिन्यापूर्वी अपात्र ठरविण्यात आलेल्या कुंभारगावच्या सरपंच उज्ज्वला परदेशी यांची सरपवंचपदाची खूर्ची कायम राहिली आहे. तससा निर्णय ग्रामविकास मंत्रालयाने दिला आहे.
इंदापूर तालुक्यातील कुंभारगांव ग्रामपंचायतीच्या सरपंच उज्वला दत्तात्रय परदेशी यांच्या विरुद्ध शाळेच्या कामकाजामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत गावातील ज्ञानराज कुंडलिक धुमाळ व गोकुळ किसन येडे यांनी पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे तक्रार करण्यात आलेले होते त्या तक्रारीनुसार पुणे विभागीय आयुक्त यांनी 1 जानेवारी 2024 रोजी ग्रामपंचायत सरपंच उज्वला परदेशी यांना पदावर राहण्यास अपात्र ठरविले होते.
या निर्णयास उज्वला परदेशी यांनी थेट राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या दालनात अपिल केले होते. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी या प्रकरणाचा सखोल अभ्यास करुन उज्वला परदेशी यांचे अपिल मान्य करत त्यांना कुंभारगावच्या सरपंचपदी कायम ठेवण्याचे आदेश गुरुवारी (दि. 1) दिला व पुणे विभागीय आयुक्त, सौरव राव यांनी प्रस्तुत प्रकरणी दिलेला आदेश रद्द करण्यात येत असल्याचं मंत्री गिरीष महाजन यांनी आपल्या निकाल पत्रात म्हटले आहे. त्यानुसार इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी कुंभारगावचे ग्रामविकास अधिकारी यांना आदेश बजावला आहे.
कुंभारगांव ग्रामपंचायतचे सरपंच रद्द झाल्यानंतर सरपंच पदाची जबाबदारीचे अधिकार उपसरपंचाना देणेत आलेले होते. अपिलीय निकाल सरपंच उज्वला दत्तात्रय परदेशी यांच्या बाजूने लागताच सरपंच पदाचे अधिकार पुन्हा उज्वला परदेशी यांना देण्यात यावे असे या आदेशात म्हटले आहे.
आमदार दत्तात्रय भरणे यांची चिकाटी व विचारांचा हा विजय आहे. काही ज्ञात, अज्ञात यांचेही सहकार्य, मार्गदर्शन, आशिर्वाद कामी आले. शेवटी विजय सत्याचाच होतो. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या सहकार्याने गावाचा सर्वांगीण करणार आहे. सत्य परेशान कर सकता है, पराजित नही।
-उज्ज्वला परदेशी, सरपंच कुंभारगाव