गंगाराम औटी
राजुरी – पूर्वीचा काळात या परिसरामध्ये लांडगा, तरस, कोल्हा, हरीण यांसारखे जंगली प्राणी आढळत होते; पण 25-30 वर्षांच्या कालावधीनंतर हे प्राणी कमी झाले अन् त्यांची जागा सध्या बिबट्याने घेतली. या परिसरात पाणी आहे या परिसरात ऊस शेती मोठ्या प्रमाणात केली जाते बिबट्याला पोषक वातावरणामुळे या परिसरात पूर्व सुरुवातीच्या काळात एक दोन बिबटे आढळून येत असत पण सध्या हीच बिबट्याची संख्या झपाट्याने वाढत गेली त्यामुळे क्वचित दिसणारा बिबट्या हा नेहमी दिसू लागला.
उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर आहे. कारण या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धरणे बांधली आहेत. त्यामुळे या परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस शेती करत आहे. खासगी वने व सरकारी वने वाढत्या लोकसंख्येमुळे कमी झाले, पर्जन्यमानाचं प्रमाण कमी झाल्यामुळे जंगल विरळ होत गेली. त्यामुळे बिबट्याला जंगलाची जागा असुरक्षित वाटू लागल्याने वन्यप्राणी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होऊ लागले.
अन्न, पाणी व सुरक्षित आदिवास ज्या परिसरात असेल त्या ठिकाणी स्थलांतरित होऊ लागले. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने नद्या या परिसरात अस्तित्वात असणारी पिंपळगाव जोगा, माणिक डोह, येडगाव, वडज, डिंभा यांसारखे लहान मोठी धरण या परिसरात असल्यामुळे हा परिसर सुजलाम्, सुफलाम् आहे. मोठ्या दुष्काळातही या परिसरात पाण्याची कमतरता भासत नाही.
वन्य प्राण्यांची अन्नसाखळी कमी झाली त्यामुळे बिबट कुत्र्यांवर हल्ले करू लागला. त्यामुळे या परिसरात कुत्र्यांची संख्या कमी झाली आहे. शिकार न मिळाल्याने बिबट्या मानवी वस्तीवर येऊन शेतकऱ्यांच्या पशुदानावरती हल्ले करू लागला. त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पशुधनाची शिकार होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे.
तसेच शेतकऱ्यांच्या पशुधनाची संख्या कमी होत आहे तसेच बिबट्याचे हल्ल्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे शेतकरी पशुधनाचं पालन करण्याचे प्रमाण कमी करू लागला. त्यामुळे बिबट्याला अन्न न मिळाल्यामुळे तो मानवावरती हल्ले करू लागला. मानवावरती हल्ल्यांचे प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात वाढले असून याच आठवड्यात अनेक ठिकाणी मानवावरती हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्याची गंभीर समस्या निर्माण झाली.
पैशांनी व्यक्ती परत येत नाही
बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले मृत झालेल्या व्यक्तीला शासनाकडून 25 लाख रुपये दिले जातात पणहल्ल्यात गेलेली व्यक्ती पुन्हा येत नाही त्यामुळे गेलेल्या व्यक्तीची किंमत पैशात होऊ शकत नाही बिबट्या या समस्येवर शासनांनी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे, यासाठी शासन स्तरावर माणव आणि बिबट्याही सुरक्षित राहिला शासनाने पाहिजे यासाठी शासनाने योग्य ती उपाययोजना करण्याची गरज आहे.
उसाची शेतीच त्यांचे सुरक्षित घर
जंगलात राहणारा बिबट्या आपलं घर म्हणून उसाच्या शेतात राहू लागला, त्याला ऊस शेती हीच जंगल वाटू लागलं. त्याच ठिकाणी बिबट्याच प्रजनन होऊ लागले. बिबट्याने जन्म दिलेल्या बछड्याला “उसाची शेती सुरक्षित आणि आपलं घर वाटू लागलं’ बिबट्याच्या वाढत्या प्रजननामुळे बिबट्याच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे बिबटे मानवी वस्तीकडे अन्नाच्या व पाण्याच्या शोधात येऊ लागले तेथूनच बिबट आणि मानवाचा संघर्ष सुरू झाला.