बिजवडी -कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ऊस तोडणी कार्यक्रम संगणीकृत करण्यात येत आहे, अशी माहिती माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री तथा चेअरमन हर्षवर्धन पाटील यांनी दिली. कर्मयोगी कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामात 31 वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ पाटील, व्हाईस चेअरमन पद्माताई भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
पाटील म्हणाले, हंगामातील कारखान्याच्या मशिनरीची सर्व कामे पूर्ण होत आली आहेत. ऊस तोडणी यंत्रणा सज्ज करण्याचे काम सुरू आहे. यावर्षी 14 लाख टन कार्यक्षेत्रातील नोंद, बिगरनोंद तसेच कार्यक्षेत्राबाहेरील 2 लाख, असा एकूण 16 लाख टन ऊस उपलब्ध आहे. कारखान्याने 575 ट्रक, टॅक्टरचे करार करून ऍडव्हान्स वाटप केले आहे. 700 बैलगाडी तसेच 450 ट्रॅक्टरगाड्यांचे करार केले आहेत.
कार्यक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने उसाची मुबलक उपलब्धता आहे. यावेळी सत्यनारायण महापूजा सविता व सुभाष काळे या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी संचालक भरत शहा, भास्कर गुरगुडे, विष्णू मोरे, हनुमंत जाधव, मच्छिंद्र अभंग, अंकुश काळे, प्रशांत सूर्यवंशी, यशवंत वाघ, मानसिंग जगताप, राजेंद्र गायकवाड, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, वसंत मोहोळकर, केशव दुर्गे, अतुल व्यवहारे, राजेंद्र चोरमले, पांडुरंग गलांडे, सुभाष भोसले, जयश्री नलवडे, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, विभागप्रमुख उपस्थित होते.