राजगुरुनगर – भीमा, भामा नदीच्या दोन्हीं बाजुच्या किनार्यावर असलेल्या विद्युत रोहित्राचा विद्युत पुरवठाबंद करण्याचे आदेश जलसंपदा विभागाकडून देण्यात आल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे.
खेड शिरूर तालुक्यातील शेतकर्यांच्या शेतातील उन्हाळी बाजरी, भुईमूग, मका तसेच तरकारी व चारा पिकांना पाणी सिंचनाची गरज असताना शासनाने घेतलेल्या निर्णयाचा फटका बसणार आहे. या निर्णयाच्याबाबत खेड आणि शिरूर तालुक्यातील शेतकर्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने केलेल्या कारवाईचा रोष उमेदवारांवर येणार असल्याचे बोलले जात आहे. जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप यांनी महावितरण कंपनीला गुरूवारी (दि. 11) हा आदेश दिला आहे.
त्याची कारवाई करण्यात झाल्यास उन्हाळी पिकांचे नुकसान होणार आहे. यावरून दोन्ही तालुक्यातील शेतकर्यांमध्ये नाराजीचा सुर आहे.