आंबेगाव : आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार परिसरात काल दुपारी तीन ते पाच च्या दरम्यान अतिवृष्टी व गारपटीने मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान केले आहे यामध्ये कांदा बटाटा ज्वारी हरभरा लसूण टोमॅटो इत्यादी पिकांचा समावेश आहे.
आज राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नियोजित असलेले सर्व दौरे रद्द करून सातगाव पठारातील नुकसान झाले पिकांची पाहणी करण्यात आली. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक प्रांत अधिकारी, तहसीलदार गट विकास अधिकारी, उपकार्यकारी अभियंता वीज मंडळ घोडेगाव मंडळ, कृषी अधिकारी,
सरपंच मनीषा तोतरे, उपसरपंच जितेंद्र तोत्रे ,विकास बारवे ,कैलास तोत्रे, पोलीस पाटील प्रगती तोतरे ,कारखान्याचे चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विष्णू काका हिंगे, संतोष धुमाळ ,माऊली एरंडे ,तलाठी माने ,विकास बारवे ,दत्तात्रय तोतरे आदी उपस्थित होते.
यावेळी सहकार मंत्री जिल्हाधिकाऱ्याला आदेश देऊन ताबडतोब पंचनामे करण्याची सूचना दिली आहेत कालच्या पावसाने सातगाव पठारातील सर्व पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दोन दिवसात अधिकाऱ्यांना सूचना पंचनामा करण्यात देण्यात आले आहे