राजगुरूनगर : रेटवडी (ता. खेड) येथील स्मशानभूमीत अघोरी कृत्य घडले आहे. येथील वैकुंठ स्मशानभूमीत बोकडाचे मुंडके व पाय कापून ठेवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या कृत्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असू असे कृत्य करणाऱ्या शोधून त्यावर कडक करावी पोलिसांनी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी खेड पोलिसांकडे केली आहे.
रेटवडी येथे सोमवारी (दि. 17) अमावास्या असल्यामुळे गावच्या स्मशानभूमीत बोकडाचे मुंडके, पाय काळ्या रंगाच्या बाहुल्या, लिंबू, सुई, हळद-कुंकू आढळून आले. मंगळवारी (दि. 18) सकाळी ग्रामस्थांना हा प्रकार समजला त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
अघोरी विद्याच्या सहाय्याने गुप्तधन शोधणे, नरबळी देणे, पैशाचा पाऊस पाडणे, अघोरी उपाय करुन रुग्णांवर उपचार करणे किंवा भाणामती करणे असे अंधश्रद्धेचे प्रकार आपण नेहमी ऐकतो वाचतो.
त्यांच्यातीलच हा एक प्रकार असल्याची परिसरात चर्चा आहे. मात्र असे कृत्य करणाऱ्यांचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी रेटवडीचे माजी सरपंच दिलीप पवळे, ग्रामपंचायत सदस्य किरण पवार व ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली आहे.