वानवडी – वानवडीच्या विकासामध्ये केदारी कुटुंबियांचे मोठे योगदान आहे. परिसराचा विकास दूरदृष्टीकोन ठेवून केलेला दिसून येतो, यामुळेच जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिल, असा विश्वास माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केला.
वानवडी येथे माजी गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश बागवे यांच्या उपस्थितीत आरोग्य व नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन व वानवडी प्रभागातील स्वच्छ संस्थेतील १०२ महिला भगिनींना साडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटचे उपाध्यक्ष साहिल शिवाजीराव केदारी यांनी केले होते. यावेळी रमेश बागवे बोलत होते.
यावेळी पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शिवाजीराव केदारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक अविनाश बागवे, सरपंच दत्तोबा जांभुळकर, सुदामराव जांभुळकर, सतिश गवळी, दीपक केदारी, विठ्ठल चौगुले, पुंडलिक गवळी, एसआरपीएफचे डीवाय एसपी संतोष गायके, रमेश काकडे, रविंद्र म्हसकर, किसन केदारी, राजेंद्र गिरमे, केरुपंत शिवरकर, ज्ञानोबा बधे, कुंडलिक कुर्हे, शामराव ओव्हाळ, ज्ञानेश्वर जांभुळकर, गणपत कोकरे, संतोष सुपेकर, चेतन पडवळ, विपीन केदारी, किरण बोराटे, अविनाश निंबाळकर व इतर मान्यवर उपस्थित होते.