नवी दिल्ली – केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकरी दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर केंद्र सरकारने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना थांबविण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर काही फोटो शेअर करून ‘भारत सरकार, भिंती उभारू नका, पूल उभारा, असे कॅप्शन दिले आहे.
GOI,
Build bridges, not walls! pic.twitter.com/C7gXKsUJAi
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 2, 2021
तर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनीदेखील एक व्हिडीओ शेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे. या व्हिडिओला पंतप्रधान महोदय, आपल्याच शेतकऱ्यांशी युद्ध? असे कॅप्शन दिले आहे.
प्रधानमंत्री जी, अपने किसानों से ही युद्ध? pic.twitter.com/gn2P90danm
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) February 2, 2021
दरम्यान, प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळांवर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. पोलिसांकडून गाझीपूर सीमा, टिकरी सीमा आणि सिंघू सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था केली जात आहे. आंदोलनकर्ते पुन्हा दिल्लीकडे ट्रॅक्टर आणू नये यासाठी सीमेवर मोठ्या प्रमाणात बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. तसेच, रस्त्यांवर खिळे ठोकण्यात आले आहेत. काटेरी ताराही लावण्यात आले आहेत. याशिवाय आर्मी मेरीट वर्कशॉपमधून दोन क्रेनही आणण्यात आल्या आहेत. अशातच शेतकरी संघटना ६ फेब्रुवारीला देशव्यापी चक्का जाम आंदोलन करणार आहेत.