नवी दिल्ली – जनतेच्या मनात एक पक्षीय हुकूमशाही लादली जाण्याविषयीचे भय आहे. विरोधकांची सत्ता असणाऱ्या राज्यांना अस्थिर करण्याचे प्रयत्न होण्याची आणि केंद्रीय यंत्रणांचा निवडक वापर होण्याचीही धास्ती व्यक्त केली जाते, असे परखड भाष्य कॉंग्रेस नेते अधिररंजन चौधरी (Adhir Ranjan Chaudhary) यांनी सोमवारी लोकसभेत केले.
अधिररंजन यांनी लोकसभेतील (lok sabha special session) चर्चेत सहभागी होताना प्रत्येकालाच व्यापक अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळायला हवे, अशी भूमिका मांडली. भारत हा अनेकतत्ववादाशी निगडीत देश आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मताचा आदर व्हायला हवे. मात्र, सध्या सर्वसमावेशकता आढळत नाही.
..तर दोन्ही देशांत आजसारखे दृढ संबंध दिसले नसते
खरेतर, अहंकार सोडायला हवा, असे म्हणत त्यांनी जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिए असा जुन्या हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग म्हटला. त्यातून त्यांनी मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधला. देशाच्या विकासात सर्वच माजी पंतप्रधानांनी योगदान दिले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Prime Minister Manmohan Singh) हे बोलायचे कमी; पण काम जास्त करायचे. त्यांच्याच कार्यकाळात भारत आणि अमेरिकेत अणुऊर्जा करार झाला. ते घडले नसते; तर दोन्ही देशांत आजसारखे दृढ संबंध दिसले नसते, असेही त्यांनी म्हटले.