अहमदनगर : आपल्या लाडक्या बाप्पाला राज्यात सर्वच ठिकाणी निरोप देण्यात येत आहे. त्यातच अहमदनगरमध्येदेखील बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीस सुरूवात झाली आहे. शहरात चौका चौकामध्ये बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्वांनी तयारी सुरू केली आहे. प्रत्येक चौकात भव्य रांगोळ्या काढण्यात येत आहेत. तसेच माळीवाडा येथील धरती चौकात विशाल गणपतीच्या विसर्जन मिरवणूकरचे आगमन झाले आहे.