PRASHANT KISHOR ON ELECTION। आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहताना दिसत आहे. निवडणूक आयोगाकडून लवकरच या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होऊ शकते. दरम्यान, भाजप,काँग्रेससह देशभरातील सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केलीय. त्यातच निवडणूक रणनीतिकार प्रशांत भूषण यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
भाजपाच्या ‘अब की बार ४०० पार’ ला अर्थ नाही PRASHANT KISHOR ON ELECTION।
प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीसंबंधी वक्तव्य करताना भाजपच्या धोक्याच्या घंटेची माहिती दिली. ते म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस १०० जागादेखील जिंकू शकणार नाही. मला काँग्रेसच्या जागांमध्ये फारसा बदल होईल दिसत नाहीये दरम्यान, प्रशांत किशोर यांनी भाजपाच्या ‘अब की बार ४०० पार’ या घोषणेलाही फारसा अर्थ नसल्याचे स्पष्ट सांगितले. भाजपा ३७० जागादेखील जिंकू शकणार नाही, असेही त्यांनी म्हटले.
मोदींना कोणीच पराभूत करू शकत नाही PRASHANT KISHOR ON ELECTION।
प्रशांत किशोर यांना एका वृत्तवाहिनीच्या मुलाखती दरम्यान ही माहिती दिली. आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना कोणी आव्हान देऊ शकतं का? यावर प्रशांत किशोर म्हणाले, जी व्यक्ती पाच वर्षे जमिनीवर राहून (ग्राऊंड लेव्हलवर) काम करणार असेल, मेहनत करणार असेल ती व्यक्त मोदींसमोर मोठंआव्हान निर्माण करू शकते. मोदींना कोणीच पराभूत करू शकत नाही, असल्या भ्रमात कोणीही राहू नका. त्याचबरोबर वृत्तवाहिन्यांनीदेखील असल्या अफवा पसरवू नये.असा सल्ला देखील त्यांनी दिला.
प्रशांत किशोर पुढे,“मोदींना पराभूत करणं शक्य आहे. गेल्या १० वर्षांमध्ये मोदींनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांनी गेल्या १० वर्षांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये लहान-मोठे पराभव पाहिले आहेत.” असे म्हटले. प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये ‘जनसुराज यात्रा’ काढलीय. या यात्रेच्या माध्यमातून ते बिहारमधील जनतेचं निवडणूक आणि मतदानाबाबत प्रबोधन करत आहेत. प्रशांत किशोर लवकरच अधिकृतपणे बिहारच्या राजकारणात उतरतील असेही म्हटलं जातंय.
इंदिरा-राजीव गांधींना देखील पराभवाची चव चाखायला लावली PRASHANT KISHOR ON ELECTION।
प्रशांत किशोर म्हणाले, इंदिरा गांधी सत्तेत होत्या तेव्हा आणि राजीव गांधी यांनी प्रचंड बहुमताच सरकार बनवलं होतं. तेव्हादेखील काही लोकांना असं वाटत होतं की यांना आता कोणीच पराभूत करू शकत नाही. परंतु, या देशातल्या जनतेने इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनादेखील पराभवाची चव चाखायला लावली होती. १९७७ मध्ये जनता पार्टीने इंदिरा गांधींसमोर मोठं आव्हान निर्माण केले होते. तसेच त्या निवडणुकीनंतर इंदिरा गांधींनी सत्ता गमावली होती.
काँग्रेस पक्षाच्या वाटचालीबाबत प्रशांत किशोर म्हणाले, ५०-५५ जागा जिंकून तुम्ही या देशाचं राजकारण आणि सत्ताकारण बदलू शकत नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेससाठी काही सकारात्मक गोष्टी घडतील असं मला वाटत नाही. काँग्रेसमध्ये काही सकारात्मक बदल होताना मला दिसत नाहीत. मोठा बदल घडवून आणण्यासाठी काँग्रेसला किमान १०० जागा तरी जिंकाव्या लागतील. काँग्रेस १०० च्या आसपास पोहोचण्याची शक्यतादेखील कमीच आहे. सध्याच्या घडीला तरी ते शक्य नाही.
भाजपाने यंदाच्या निवडणुकीत ३७० जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. याबाबत प्रश्न विचारल्यावर प्रशांत किशोर म्हणाले, भाजपाने हे लक्ष्य केवळ त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी ठेवलं आहे. त्यांना सक्रीय ठेवण्यासाठी, त्यांच्याकडून अधिकाधिक मेहनत करून घेण्यासाठी, त्यांच्यातलं चैतन्य कायम राखण्यासाठी भाजपाने हे लक्ष्य ठेवलं आहे. परंतु, लोकांनी यावर विश्वास ठेवू नये. प्रत्येक नेत्याला आणि पक्षाला डोळ्यांसमोर एक मोठं आव्हान ठेवण्याचा अधिकार आहे. त्याने ते आव्हान पूर्ण केलं तर ती त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. परंतु, ते लक्ष्य पूर्ण करता आलं नाही तर त्या पक्षाने इतकं नम्र असावं की, त्यांनी त्यांच्या चुका स्वीकारायला हव्यात.