Prakash Mahajan on BJP। राज्याच्या राजकारणात नुकतीच मोठी घटना घडली. काँग्रेसचे माजी आमदार अशोक चव्हाण यांनी पक्षाला सोडचिट्ठी देत भाजपवासी झाले. यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळातून यात संमिश्र प्रतिक्रिया आल्या. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून भाजपवर टीका केलीय.
मग आम्ही का चालत नाही? Prakash Mahajan on BJP।
मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी भाजपवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी,भाजपने ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, गाडीभर पुरावे दिले. अशोक चव्हाण यांच्यावर देखील तुम्ही आरोप केलेत, त्यांना तुम्ही पक्षात घेतलं. आमच्या पक्षात असे कोणावर आरोप नाहीत, मग आम्ही का चालत नाही? भ्रष्टाचार मिटवायला निघाली भाजपा पक्ष भ्रष्टाचाराला आपल्यात सामावून घेते आहे. शंकरराव चव्हाण यांनी आणीबाणीत केलेला अत्याचार भाजपा कसं विसरलं? असे प्रश्न त्यानी विचारले.
हेही वाचा
भाजप-मनसे युतीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात,”आम्ही एकत्र येऊन काम करू…”
प्रकाश महाजन यांनी, मनसे महाराष्ट्राच्या राजकारणात अस्पृश्य पक्ष आहे, असं म्हणतात, मात्र अस्पृश्यांना मिळणाऱ्या सगळ्या सवलती आम्हाला दिल्या पाहिजेत. देवेंद्र फडणवीस आम्हाला मैत्री हवी, पण युती नको असं म्हणतात. पण हिंदुत्व मानणाऱ्या पक्षासोबत युती व्हायला हवी होती. असं ते म्हणाले.
‘ते पैसे आदर्श घोटाळ्यातले नाहीत ना? Prakash Mahajan on BJP।
प्रकाश महाजनांनी अशोक चव्हाणांना सवाल करत म्हणाले, पक्षप्रवेशाच्या वेळी अशोक चव्हाण असं म्हणाले होते, “मला भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी पक्ष सदस्य झाल्याची पावती दिली आणि त्या पावतीचे मी पैसे दिले. मला शंका आहे ते पैसे आदर्श घोटाळ्यातले नाहीत ना?”
महाजन पुढे म्हणाले, भारतीय जनता पक्षात नवीन ट्रेड आलाय, मत मांडणारे नको, ऐकणारे हवेत. मत मांडणाऱ्या लोकांना तिथे संधी दिली जात नाही असा आरोप महाजनांनी केलाय. तसेच अशोक चव्हाणांनी जरी भाजप प्रवेश केला असला तरी ते कोणत्या तोंडाने हिंदुत्वावर बोलणार आहेत? असा सवाल देखील त्यांनी केला.