Prithviraj Chavan – राज्यातील राजकरणात सध्या आरोप प्रत्यारोप होतांना दिसत आहे. नुकतेच काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या विधानावरून राजकारण चांगलेच तापले आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,’मला राज्य सहकारी बँकेबद्दल काही कडक निर्णय घ्यावे लागले. त्याची राजकीय किंमत मला भोगावी लागली. २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेसने माझं सरकार पाडलं, असं विधान काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं. त्यांच्या वक्तव्यानंतरआता खासदार प्रफुल्ल पटेल यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
प्रफुल्ल पटेल माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’२०१४ साली राष्ट्रवादीनं सरकार पाडलं, असं त्यांचं मत आहे. तर, आज राष्ट्रवादीबरोबर त्यांनी युती का केली आहे? त्यांनी युती करायला हवी नव्हती. तसेच, पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस-राष्ट्रवादी युतीचे आमदार म्हणून निवडून आले आहेत” असं सडेतोड उत्तर पटेल यांनी दिल आहे.
तत्पूर्वी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते की,’मला राज्य सहकारी बँकेबद्दल काही कडक निर्णय घ्यावे लागले. त्यामुळे संचालक मंडळ बरखास्त करून तिथे प्रशासक नेमावं लागलं. त्याची राजकीय किंमत मला भोगावी लागली. २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेसने माझं सरकार पाडलं. सरकार पडलं नसतं आणि आम्ही एकत्र निवडणूक लढवली असती. तसेच, २०१४ साली काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आले असतं. भाजपाचं सरकार आलेच नसते.’