राष्ट्रीय जीवनातून संघर्षवृत्ती नष्ट झाली पाहिजे
नवी दिल्ली, दि. 23 – आपल्या राष्ट्रीय जीवनातून संघर्षाची वृत्ती सोडून, एकत्र काम करण्याची आणि सामूहिक विकासाची वृत्ती बाणावली पाहिजे, असे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सांगितले. सरकार अल्पसंख्याकांविषयी चिंता करीत असते असे सांगून गांधी म्हणाल्या, या देशाला सहनशीलतेची परंपरा आहे. त्यामुळेच अल्पसंख्याकांकडे विशेष लक्ष दिले जात आहे. जुनी कमजोरी, पूर्वग्रह, अहंकार सोडून देशाची बांधणी करणे हे आमचे लक्ष्य आहे. नव्या समाजात समानता असेल आणि एकमेकांविषयी आदराची भावना असेल. नव्या उभारणीचा हाच पाया राहील.
राष्ट्रसंघ प्रबळ करा
नवी दिल्ली – राष्ट्रसंघाची परिणामकारकता आणि आंतरराष्ट्रीय प्रभाव वाढविण्यासाठी सर्व राष्ट्रांनी प्रयत्न करावा, असे आवाहन राष्ट्रसंघाचे सरचिटणीस कुर्न वाल्डहाइस यांनी केले. राष्ट्रसंघाचा 31वा वर्धापनदिन उद्या दि. 24 रोजी आहे. या निमित्ताने डॉ. वाल्डहाइस यांनी हा संदेश दिला. राष्ट्रसंघात प्रारंभी 3 राष्ट्रे होती. आता सभासद संख्या 145 आहे.
व्हेटोचा अधिकार नष्ट करा ः डॉ. वईयेको
नैरोवी – राष्ट्रसंघात व्हेटो वापरण्याचा अधिकार रद्द करावा किंवा आफ्रिकन राष्ट्रांविरुद्ध तो वापरू देऊ नये, अशी मागणी केनियाचे परराष्ट्र मंत्री मुनमुआ वईयेको यांनी केली. डॉ. वईयेको यांनी बड्या राष्ट्रांवर कठोर टीका केली.