चिंबळी -चिंबळी (ता. खेड) परिसत रात्रीच्यावेळी नागरिक आकडा टाकून वीजचोरी असल्याने 100 एचपीचे रोहित्र जळाले आहे. त्यामुळे पद्मानगर ते कडवस्तीचा परिसर अंधार गेला आहे. काही वीजचोरांमुळे नियमीत बिल भरणाऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याने वीजचोरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून रोहित्राची रक्कम वसूल करावी, अशी मागणी जोर धरीत आहे.
चिंबळी परिसरात वीजपुरवठा खंडित झाला असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या वाढली आहे. त्यातच वातावरण बदल झाला असून उष्णता वाढली आहे, त्यामुळे गरमीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच आता वीजपुरवठा खंडीत झाला असल्याने “चोर सोडून संन्याशल्ला’ शिक्षा मिळत असल्याचे चिंबळीकरांचे म्हणणे आहे.
या परिसरात रात्रीच्या वेळी आकडे टाकून वीज चोरी केली जात आहे. वापरली जात असल्याने रोहित्रावर लोड आल्याने तो जळाला आहे. रोहित्र बदली करण्यासाठी अर्ज केलेला असून रविवारपर्यंत या ठिकाणी नवीन रोहित्र बसवून वीजविपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.
– गणेश गायकवाड, कर्मचारी, महावितरण