नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना खंडित केली. मोदींनी दिलेल्या त्या न्यु ईयर गिफ्टमुळे देशातील 81 कोटी गरिबांच्या रेशनमध्ये निम्मी (50 टक्के) कपात होईल, असा आरोप कॉंग्रेसने मंगळवारी केला.
अदानी, अंबानी माझ्या भावाला विकत घेऊ शकले नाहीत – प्रियंका गांधी
करोना संकटामुळे मोदी सरकारने गरीब कल्याण अन्न योजनेखाली 28 महिने मोफत अन्नधान्य पुरवले. त्या योजनेमुळे गरिबांना प्रत्येकी 10 किलो अन्नधान्य मिळत होते. आता ती योजना खंडित झाल्याने गरिबांना केवळ 5 किलो मोफत अन्नधान्य मिळेल. ते राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत उपलब्ध होईल.
गरिबांच्या रेशनमध्ये कपात झाल्याने मोदी सरकार प्रमुख लाभार्थी ठरले आहे. सरकारचे 1 लाख कोटी रूपये वाचणार आहेत. त्याउलट, पाच सदस्यांच्या कुटूंबाला दर महिन्याला अतिरिक्त 750 रूपये मोजावे लागतील. म्हणजेच, कुटूंबाचा खर्च प्रतिवर्षी 9 हजार रूपयांनी वाढेल, असा दावा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केला.