औंध – नागरिकांच्या भावनेचा विचार करून लोकप्रतिनिधींनी काम सांगण्याच्या आधीच कामे केली पाहिजेत. नागरिक आपल्या कडे येण्या आगोदराच आपण नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी दूर केल्या पाहिजेत असे योगिराज नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर म्हणाले. नगरसेविका स्वप्नाली प्रल्हाद सायकर यांची औंध प्रभाग समिती अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात ज्ञानेश्वर तापकीर बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की निवडणुका येतील निवडणुका जातील पण सगळ्यांनी एकत्र रित्या कामे केली पाहिजेत. यावेळी तपकीर यांनी बाणेर बालेवाडी तील नगरसेवक करत असलेल्या कामांचे कौतुक केले. बाणेर , बालेवाडी मधून महानगर पालिकेस मोठ्यप्रमाणावर महसूल मिळत असून देखील विकास कामांना कमी प्रमाणात निधी मिळत असल्या मुळे तपकीर यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.
योगिराज नागरी पतसंस्था, बाणेर नागरी पतसंस्था, श्रीराम समर्थ पथासंस्था व भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, बाणेर ग्रामस्थ असे सत्कार समारंभ वेगवेगळे न घेता सर्वांनी मिळून एकत्रित सत्कार करावा म्हणून व्यासपीठावर बाणेर बालेवाडीतील सर्व राजकीय पक्षातील नेते एकत्रित आले आहे. एकीकडे माणुसकी हरवत चालली असताना ती टिकविण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न केला आहे. माणुसकीचा झरा वाहत ठेवण्यासाठी ही सुरुवात आहे, असे अध्यक्षीय भाषणात ज्ञानेश्वर तापकीर म्हणाले.
यावेळी नगरसेविका स्वप्नाली प्रल्हाद सायकर यांची औंध प्रभाग समिती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल युवा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त रवी घाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच श्री खंडेराय प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष गणपत बालवडकर यांची टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आयोजक डॉ. दिलीप मुरकुटे यांनी सांगितले की, नगरसेविका स्वप्नाली सायकर यांची निवड झाल्याने बाणेर गावाला एक महत्वाचे पद मिळाले आहे. त्यामुळे बाणेर गावच्या विकासात भर पडणार आहे. अशा महत्वाच्या पदी निवड झाल्याने बाणेर गावची सून म्हणून त्यांचा सन्मान करणे महत्वाचे होते. खंडेराय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणपत बालवडकर यांची टेनिस हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशनच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल सन्मान करत आहे.
सत्कारला उत्तर देताना नगरसेविका स्वप्नाली सायकर यांनी सांगितले की घरच्या लोकांनी केलेला सत्कार हा फार मोठा आनंद देतो. या संस्कारामुळे काम करण्याची ऊर्जा वाढली आहे, जबाबदारी वाढली आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीयपुरस्कार प्राप्त रविंद्र घाटे, योगीराज पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्र्वर तापकीर, बाणेर नागरी पतसंस्थेचे संस्थापक डॉ दिलीप मुरकुटे, नगरसेवक बाबुराव चांदेरे, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, गणपत बालवडकर, माजी नगरसेवक शिवाजी बांगर, डॉ. सागर बालवडकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, प्रकाश बालवडकर ,अनिकेत मुरकुटे, जिवन चाकणकर, राम गायकवाड, राजेंद्र मुरकुटे, विजय विधाते, दत्तात्रय तापकीर, लक्ष्मण सायकर, संजय बालवडकर, राजेश विधाते, ॲड. पांडुरंग थोरवे, विशाल विधाते, नितिन कळमकर, ॲड. दिलिप शेलार, पूनम विधाते, सुषमा ताम्हाणे आदी उपस्थित होते.