बेंगळुरू : भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात अवघ्या 28 चेंडूत अर्धशतक फटकावले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने भारताचे महान कर्णधार कपिल देव यांचा तब्बल 40 वर्षे आबाधित राहिलेला कसोटीतील सर्वात कमी चेंडूत वेगवान अर्धशतकाचा विक्रम मागे टाकला.
कपिल देव यांनी 1982 साली पाकिस्तान दौऱ्यावर कराची कसोटीत केवळ 30 चेंडूत अर्धशतकी खेळी केली होती. पंतने हा विक्रम आता आपल्या नावावर जमा केला. तसेच त्याने या खेळीसह यंदाच्या वर्षी 500 धावा पूर्ण करण्याचीही कामगिरी केली. पंतने गेल्या 16 कसोटी सामन्यात 42.37 च्या सरासरीने 1 हजार 17 धावा केल्या आहेत. यात 2 शतके व 6 अर्धशतकांचा समावेश आहे.