मुंबई : “पवार साहेबांचं बीड जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे. पण आता जिल्ह्यातले नेते आणि कार्यकर्ते दोन्ही पक्ष सोडून जात असल्याने त्यांनी बीड मधील उमेदवारांची नवे जाहीर केले आहेत” अशी टीका महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंनी केली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून बुधवारी त्यांनी बीड मधील कार्यकर्ता मेळाव्यात विधानसभा निवडणुकीच्या पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यावर पंकजांनी राष्ट्रवादीला टोला लगावला आहे.
पुढे बोलताना मुंढे म्हणाल्या, बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक अमच्यासाठी चॅलेंज ठरणार आहे. परंतु मला वाईट वाटतंय कि थेट कॅप्टनलाच येऊन बीड मध्ये थांबाव लागतय. त्यामुळे पवार साहेबांचा बीडजिल्ह्यातील नेतृत्वावर किती विश्वास राहिलाय हे दिसून येतंय. असं म्हणत धनंजय मुंढेंना टोला लगावला आहे.
दरम्यान बीड मध्ये जाहीर केलेल्या उमेदवारांच्या नावाबद्दल पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की उमेदवारांची नावे जाहीर करणे ही माझी चूक झाली आहे. कारण ते काम प्रदेशाध्यक्षांच आहे. परंतु त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांचा उस्साह आणि आग्रह पाहून मीच उमेदवारांची नवे जाहीर केली. असे पवार म्हणाले आहेत.