Pankaja Munde । यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी बीड मतदार संघातून भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळे एकीकडे पाच वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून दूर गेलेल्या पंकजा मुंडेंना पक्षाने हि संधी दिलीय असं म्हटलं जातंय. तर दुसरीकडं त्यांच्याच भगिनी प्रीतम मुंडेंना डावलल्याने चर्चांना उधाण आलंय. याच संदर्भात आता खुद्द पंकजा मुंडेंनी महत्वाचे भाष्य केलंय. त्यांनी आपण लोकसभेसाठी इच्छुक नव्हतो असे म्हटले आहे.
पंकजा मुंडेंनी बीडमध्ये एका सभेमध्ये पंकजा मुंडेंनी महाराष्ट्रानं उमेदवारी दिली नसून मोदांनी दिलीय, असं वक्तव्य केलंय. त्यामुळे त्यांचा नेमका रोख कोणाकडे होता. यावरून तर्क लढवले जातायेत. याविषयी बोलताना, “मला उमेदवारी मोदींनी दिली, माझं तिकीट राज्यानं ठरवलेलं नाही. देशानं ठरवलयं. मला लोकसभा लढवायची नव्हती. कारण मला राज्यात काम करायची इच्छा होती. पण माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी बुद्धीनं निर्णय घेतला”, असे त्यांनी यावेळी म्हटले.
“त्यांनी सहा महिन्यांपासून ससेमिरा लावला Pankaja Munde ।
स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बोलताना पंकजा मुंडेंनी आपल्या निर्णयावर “मला माझ्या बहिणीला विस्थापित करायचं नाही. पण या युतीमुळेच परळी मतदारसंघाचा प्रश्न उभा राहिला. दिल्लीच्या लोकांनी गेल्या सहा महिन्यांपासून ससेमिरा लावला होता की आम्हाला तुम्ही दिल्लीत हव्या आहात. पण मी कोणत्याही परिस्थितीत नाहीच म्हणायचे. पण आता कोणत्याही चर्चेशिवाय थेट नावच जाहीर झालं”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
“…तर मी २०१४ लाच दिल्लीत गेले असते” Pankaja Munde ।
दरम्यान, “गोपीनाथ मुंडे जिवंत असते तर मी २०१४ लाच दिल्लीत गेले असते. कारण ते मुख्यमंत्री होण्यासाठी राज्यात आले असते आणि मला त्यांनी दिल्लीला पाठवलं असतं. मी काही उमेदवारीसाठी बायोडेटा घेऊन फिरले नाही. पण मला ही उमेदवारी आली आहे”, असं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं.
“हा कडू घोट मला प्यावा लागला. समुद्रमंथनातून निघालेलं विष महादेवालाच पचवावं लागलं. कधीकधी राजकारणात एखाद्या माणसाला ती भूमिका घ्यावी लागते. मी मोठी आहे, मला ती भूमिका घ्यावी लागली. देणं हा माझा स्वभाव आहे, घेणं नाही. मला ते वाईट वाटतं. पण कदाचित आत्ताच्या राजकीय परिस्थितीत हेच योग्य आहे. प्रीतम मुंडे उभ्या असत्या तरी मी हेच केलं असतं”, असंही त्या म्हणाल्या.