पालघर/नाशिक :- राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. नाशिकजवळ 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. तर दुसरीकडे पालघरही पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हारदले आहे. याठिकाणी पहाटे 4 वाजून 4 मिनिटांनी भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पालघरमधील डहाणू तलासरी तालुक्यात भूकंपाचा हादरा जाणवला आहे. या भूकंपाची तीव्रात 3.4 रिश्टर स्केल इतकी नोंद झाली. तसेच नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी नुसार नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेला 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला.
Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला पंडित नेहरूच जबाबदार – सुधीर मुनगंटीवार
नाशिमधील या भूकंपाचे धक्के जमिनीखाली 5 किमी खोलीवर जाणवले. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नसल्याचे समजते.