नागपूर – महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना या सीमा वादाला पंडित नेहरुच जबाबदार असल्याची प्रतिक्रिया भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. हा सीमा प्रश्न पंडित नेहरुंमुळे उद्भवदला असून त्यांनी केलेली चूक कर्नाटकच्या सीमेवरील मराठी माणसाला भोगावी लागते आहे, असे ते म्हणाले.
नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना यासंदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिली. मुनगंटीवार म्हणाले, पंडित नेहरुंनी केलेली चूक कर्नाटकच्या सीमेवरील मराठी माणसाला भोगावी लागते आहे. त्यांनी राज्य पुर्नरचना आयोगाच्या माध्यमातून केलेली चूक आजही त्रासदायक ठरते आहे.
अनेक वर्षंपासून हा संघर्ष असाच सुरू आहे. हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. 40 गावांच्या संदर्भात दोन्ही राज्य सकारात्मक असतील. तर निश्चितपणे सर्वोच्च न्यायालय दोन्हीही राज्यांचे म्हणणे ऐकूण योग्य तो निर्णय देतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
चुकीला माफी नाही! सौदी अरेबियात 10 दिवसात 12 लोकांचा शिरच्छेद; तीन पाकिस्तानी लोकांचा समावेश
कर्नाटकमधील मराठी जनतेला महाराष्ट्रात यावे असे वाटणे स्वाभाविक आहे. मी जेव्हा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना भेटलो तेव्हा त्यांची महाराष्ट्रात येण्याची तीव्र इच्छा मला जाणवली होती. त्यांना आजही वाटतं की आपण महाराष्ट्रात जावे. मात्र, त्यांना नेहरुंच्या चुकीचे परिणाम भोगावे लागत आहेत, असेही ते म्हणाले.