Pakistan election – पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालावर देशाचे अध्यक्ष डॉ. रशिद अल्वी यांनी स्पष्ट प्रतिक्रीया दिली आहे. देशातील जनतेने केवळ बोलून नव्हे, तर ओरडून आपला कौल दिला आहे, असे त्यांनी आपल्या प्रतिक्रीयेमध्ये म्हटले आहे.
देशातील राजकीय पक्षांनी आणि संस्थांनी देशातील नागरिकांनी दिलेल्या कौलाचा मान राखावा आणि या जनमताला मान्य करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी २०१८ मध्ये त्यांना देशाचे अध्यक्ष बनवण्यापूर्वी अल्वी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे ज्येष्ठ सदस्य होते. निवडणुकीमध्ये पीटीआयच्या पाठिंब्यावरील अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
निवडणुकीतील निकालाबद्दल अल्वी यांनी देशाच्या जनतेचे अभिनंदन केले आहे. विशेषतः महिलांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता लोकशाहीसाठी मोठ्या संख्येने मतदान केले आहे.
मतदान प्रक्रियेमध्ये शांततापूर्ण मार्गाने सहभागी झाल्याबद्दल देशातील युवकांचा वेगळा उल्लेख केला जाणे गरजेचे आहे. त्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे. हा विश्वास खूप अनमोल आहे, यामुळे इतिहास लिहीला जाईल आणि तो ओळखलाच पाहिजे, असे ते म्हणाले.