नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारने पारित केलेले तीन नवे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतरही शेतकरी आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचे दिसत आहे. एमएसपीच्या हमीशिवाय ते मान्य करणार नसल्याचे शेतकऱ्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. तर आता दुसरीकडे एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. जर एनपीआर आणि एनआरसी कायदे कृषी कायद्याप्रमाणे रद्द केले नाहीत तर ते बाराबंकीला आणखी एक शाहीन बाग बनवतील असा इशारा ओवेसींनी दिला आहे.
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “मी पंतप्रधान मोदी आणि भाजपाला कृषी कायद्यासारखे CAA मागे घेण्याचे आवाहन करतो कारण ते संविधानाच्या विरोधात आहे. जर त्यांनी एनपीआर आणि एनआरसी वर कायदा केला तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि इथे आणखी एक शाहीन बाग बांधली जाईल,” असे ओवेसींनी म्हटले.
I appeal to PM Modi, BJP to repeal CAA like farm laws because it is against the Constitution… If they will make NPR, NRC law, then we will take to streets & another Shaheen Bagh will come up here: AIMIM chief Asaduddin Owaisi in Barabanki pic.twitter.com/Z7LxAuZOL0
— ANI UP (@ANINewsUP) November 21, 2021
ओवेसींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. “पंतप्रधान मोदी हे देशातील सर्वात मोठे ‘नौटंकीबाज’ आहेत आणि चुकून ते राजकारणात आले आहेत, नाहीतर चित्रपटसृष्टीतील लोकांचे काय झाले असते. सर्व पुरस्कार मोदींनी जिंकले असते,” असे ओवेसी म्हणाले.
हाय @narendramodi जी, क्या एक्टिंग करते हो आप! मोदी ग़लती से राजनीति में आ गए और bollywood actors बच गए। अगर वो bollywood में होते तो Best Actor के सारे पुरस्कार उन्हें ही मिलते। pic.twitter.com/PLiUcRgFGv
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) November 21, 2021
“तीन कृषी कायदे रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर, पंतप्रधान म्हणाले होते की त्यांच्या ‘तपस्या’ (तपस्या) मध्ये काही कमतरता होत्या. आपले पंतप्रधान किती मोठे अभिनेते आहेत हे यावरून कळते,” ते पुढे म्हणाले. खरी तपस्या शेतकऱ्यांनी त्यांच्या निदर्शनांमध्ये केली होती ज्यात सुमारे ७५० शेतकरी मरण पावले, असे ओवेसी म्हणाले.
मोदी स्वतःला नायक बनवण्याची एकही संधी सोडत नाहीत, असेही ओवेसी म्हणाले. एआयएमआयएम प्रमुखांनी दावा केला की पंतप्रधान मोदींनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना संतुष्ट करण्यासाठी कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली.