कोल्हापूर – शहरात महापालिकेच्या गाळेधारकांनी भाड्याच्या मुद्द्यावरून आज अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. कोल्हापूर शहरातील गाळे भाड्याच्या मुद्द्यावरून आज गाळेधारकांनी ताटात पैसे घेऊन छत्रपती शिवाजी चौक ते महानगर पालिका मोर्चा काढला.
कोल्हापूर महापालिकेच्या मिळकतीचे तब्बल 2000 भाडेधारक गेली दोन महिने महापालिकेच्या धोरणामुळे भाडे भरलेली नाही आहेत. याबाबत अनेक वेळा आयुक्तांना भेटून भाडे भरून घेण्यासाठी निवेदन दिले. मात्र, आयुक्तांनी दुर्लक्ष करत असल्याचे आंदोलक गाळेधारकांनी केला आहे. तर महापालिका 2017 आणि 2019च्या शासकीय आदेशाची भीती दाखवून अनेक दुकानधारकांची 2012 आणि 2015 पासूनचे भाडे भरून घेतले नसल्याचे देखील भाडे धारकांनी म्हटले आहे.
महानगरपलिकेच्या या आडमुठे धोरणामुळे दोघांचेही नुकसान होत असल्याने 2017पर्यंतचे भाडे विनादंड व्याजाशिवाय करार पद्धतीने घ्यावे, प्रशासक व भाडेकरू मिळकत धारकांनी चर्चा करून मार्ग काढावा, 2019च्या आदेशानुसार कोल्हापूर महापालिका वर्गातील महापालिका असल्यामुळे अ ,ब, क या महापालिकांची नियमावली कोल्हापुरातील गाळे भाडेधारकांना लागू होऊ नये यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.