घोटावडेत राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी मेळाव्यात मार्गदर्शन
पिरंगुट : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत युवा पिढीला अधिक संधी दिल्या जातील. या साठी कार्यकर्त्यांनी गावोगावी चांगला संपर्क ठेवून सातत्याने काम केले पाहिजे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
घोटावडे – शेळकेवाडी (ता. मुळशी) येथील जय सुचंद्रिका मंगल कार्यालयात मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस व मुळशी तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचा मेळावा संपन्न झाला. त्यावेळी खासदार सुळे बोलत होत्या. यानिमित्त विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. या वेळी राजाभाऊ हगवणे, सविता दगडे, रणजित शिवतरे, महादेव कोंढरे सुनील चांदेरे, पांडुरंग ओझरकर, सचिन घोटकुले,
दगडूकाका करंजावणे, कालिदास गोपालघरे, बाबाजी शेळके, सुनील वाड़कर, सचिन अमराळे, सागर साखरे, निलेश पाडाळे, विलास अमराळे, जितेंद्र इंगवले, प्रशांत रानवडे, योगेश ठोंबरे, राहुल पवळे, प्रविण धनवे, सचिन आंग्रे, प्रसन्न ओझरकर, अनिल पवार, अंजली कांबळे, राधिका कोंढरे, कोमल वाशिवले, कोमल साखरे, दीपाली कोकरे, नेहा साठे आदी मान्यवर, तसेच विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, जनतेच्या प्रश्नासाठी युवकांनी रस्त्यावर उतरून कायदेशीर मार्गाने आंदोलन केले पाहिजे. सध्याचे सरकार दिल्लीच्या पुढे झुकणारे आहे. पद घेताना पुढे पुढे करणारे मात्र जनतेच्या दुःखात सहभागी होत नाहीत.
मनसे गप्प का?
राज्यपाल महापुरूषाचा अपमान करत असताना मराठी अस्मितेवर उडी मारणारी मनसे गप्प का? असा सवालही सुळे यांनी यावेळी केला. सत्ताधारी गटातील असूनही आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या निषेधाचे सुप्रिया सुळे यांनी कौतुक केले.