मुंबई – राज्यातील करोनाची रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचे चित्र असून राज्यात दिवसभरात फक्त 171 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 394 रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,22,754 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.10 टक्क्यांवर पोहोचले आहे. राज्यात आजपर्यंत 7,88,85,405 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
तसेच राज्यात सध्या 1680 ऍक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 317 ऍक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल ठाण्यात ऍक्टिव्ह रुग्ण आहे. ठाण्यात 168 ऍक्टिव्ह रुग्ण आहे.