Onion Export Ban । कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. सध्या कांद्याच्या निर्यातीवर बंदीवरची मुदत सरकारकडून वाढवण्यात आली आहे. आता ही बंदी 31 मार्चपर्यंत कायम राहणार असल्याचं सरकारनं म्हटलंय. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
पुढील आदेशापर्यंत कांदा निर्यातबंदी कायम Onion Export Ban ।
निर्यातबंदी 31 मार्चनंतरही कायम राहणार असल्याचे परित्रक सरकारच्या वतीन काढण्यात आलंय. पुढील आदेशापर्यंत कांद्यावरील निर्यातबंदी कायम राहणार असल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं. केंद्र सरकारनं 31 मार्चपर्यंत कांदा निर्यातबंदी केली होती. ती 31 मार्चला उठेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, देशांतर्गत बाजारपेठेतील उपलब्धता आणि किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याचं केंद्राचं म्हणणं आहे.
मागच्या वर्षी कांद्याच्या निर्यातीवर घातली होती बंदी Onion Export Ban ।
केंद्र सरकारनं 8 डिसेंबर 2023 रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घालण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी ही निर्यातबंदी 31 मार्चपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. त्यामुळं 31 मार्चनंतर तरी सरकार कांद्यावरील निर्यातबंदी उठवेल अशी अपेक्षा देशासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होती. मात्र, तसे काही झाले नाही. 31 मार्चनंतर देखील कांद्याच्या निर्यातीवरील बंदी कायम ठेवणार असल्याचा निर्णय सरकारनं घेतलाय.
केंद्र सरकार सध्या महागाई नियंत्रणात आणण्यासाठी विविध धोरणं आखत आहे. यातीलच एक धोरण म्हणजे कांद्यावरील निर्यातबंदी आहे. कांद्याच्या किंमती वाढू नये. सामान्य लोकांच्या खिशाला कात्री लागू नये म्हणून सरकार प्रयत्न करत आहे. कारण सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मतदारांना खुश करण्यासाठी सरकार असे निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र, दुसऱ्या बाजूल सरकारच्या या निर्णयामुळं देशातील शेतकरी मात्र संतप्त होत आहे. कारण कांद्यावर निर्यातबंदी केल्यामुळं दरात मोठी घसरण झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळं तातडीनं निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शेतकरी करतायेत.