श्रीनगर-उत्तर काश्मीरमध्ये रविवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. ती चकमक बांदीपोरा जिल्ह्यातील एका गावात घडली. श्रीनगरपासून सुमारे 55 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गावात काही दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली.
त्याआधारे दहशतवाद्यांच्या शोधासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. त्या मोहिमेवेळी सुरक्षा जवानांना पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यात एक दहशतवादी मारला गेला.
अखेरचे वृत्त हाती येईपर्यंत सुरक्षा दलांची कारवाई सुरूच होती. ठार झालेला दहशतवादी कुठल्या संघटनेचा सदस्य होता ते तातडीने समजू शकले नाही, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली.