मुंबई – भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना आमने-समाने आले आहेत. भाजपकडून माजी खासदार किरीट सोमय्या तर शिवसेनेकडून संजय राऊत आघाडीवर आहेत. आज संजय राऊत यांनी पुन्हा एकदा किरीट सोमय्यांवर कडाडून टीका केली आहे. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी भाष्य केल आहे.
पत्रकरांशी बोलतांना रामदास आठवलेंनी म्हणाले,’राज्यात शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये कुत्रा आणि मांजरीप्रमाणे भांडण सुरू असून कोण कुत्रा आणि कोण मांजर आहे, हे पाहणं महत्वाचं आहे, असं आठवले म्हणाले. ते पुढे म्हणाले,’ नेत्यांमध्ये सुरू असलेलं हे भांडण थांबवावं, अशी आमची इच्छा असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यासाठी पुढाकार घ्यावा.असेही ते म्हणाले आहे.
शिवसेना पक्षातील उद्धव ठाकरेंनी आणि संजय राऊत यांनी थोडी समज घ्यावी. राऊतांनी अपशब्द आणि शिवराळ भाषा न वापरता आपली महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे. असं म्हणत त्यांनी ठाकरे सर्कावर टीका केली आहे.