Manoj Jarange : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या मुद्यावरील आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आमचे धोरण असे आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे.
मग हे असो नाहीतर ते… आम्हाला त्याचे काही देणेघेणे नाही. आमचे आरक्षण जवळपास होत आले आहे. ठीक आहे. त्यांना काय करायचे ते करू द्या. त्यांना शुभेच्छा, असे ते म्हणालेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतीच आरक्षणावरील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार आले तर आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा वाढवली जाईल. आमचे सरकार जातनिहाय जनगणनाही करेल, असे ते म्हणाले.
आमचे धोरण असे आहे की, कुणीही काही म्हणो, मराठा समाजाला आरक्षण देणारे पाहिजेत. मग हे असो नाहीतर ते… आम्हाला तुमच्या पक्षाचे नेत्याचे काहीच देणेघेणे नाही. आमचे ध्येय आरक्षण हेच आहे.
मग ते कुणीही द्या. आमचे हे होत आले आले आहे. आल्यातच जमा आहे. पण जाऊ द्या. त्यांनी मराठा आरक्षणावर शब्द काढला हे महत्त्वाचे, असेही मनोज जरांगे यावेळी बोलताना म्हणाले.