नवी दिल्ली – रेल्वे प्रवासात प्रवाशांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी आणि त्यांना माहिती देण्यासाठी असलेल्या रेल्वेच्या हेल्पलाईन क्रमांकांचं रेल्वेन आता एकाच क्रमांकात एकत्रीकरण केलं आहे.
रेल्वेच्या सर्व हेल्पलाईनच्या जागी ‘139’ हा नवा नंबर कार्यरत असणार आहे. या क्रमांकावर तब्बल 12 भाषांमधून माहिती उपलब्ध असेल.
दरम्यान, या क्रमांकावर कोणत्याही मोबाईल फोनवरून फोन करता येणार आहे. प्रवाशांना हा क्रमांक लक्षात ठेवणं सोयीचं होईल आणि प्रवासादरम्यान त्यांच्या कोणत्याही तक्रारी भारतीय रेल्वेकडे दाखल करू शकतात. तसंच या तक्रारींची वेळोवेळी दखलही घेतली जाणार आहे.